कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा ‘अलर्ट’
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती निर्माण झाली असून हवामान विभागाने कोकण किनारपट्टीसाठी महत्त्वाचा इशारा जारी केला
Nilkamal Plastic Crates आहे. विशेषतः १४ फेब्रुवारी रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज आहे. या भागात हवेतील आर्द्रता जास्त असल्याने नागरिकांना घामामुळे होणारा त्रास अधिक जाणवेल. १५ फेब्रुवारीला हाच इशारा रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी वाढवण्यात आला आहे. सहसा फेब्रुवारीच्या उत्तरार्धात
Irrigation Sprinklers म्हणजेच १९-२० तारखेनंतर जाणवणारी ही उष्णता यंदा काही दिवस आधीच जाणवू लागली असून, नागरिकांनी वाढत्या उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बंगालच्या उपसागरात नवीन हवामान प्रणाली विकसित
सध्या दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर आणि विषुववृत्तीय हिंदी महासागराच्या भागात चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या प्रणालीमुळे लवकरच
Solar Camera एक कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्याची दाट शक्यता आहे. या सिस्टीमचा मार्ग प्रामुख्याने पश्चिमेकडून येणाऱ्या पश्चिमी आवर्तांवर अवलंबून असेल. जर ही प्रणाली तामिळनाडू किनारपट्टीच्या दिशेने वेगाने सरकली, तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होऊ शकते. मात्र, ही सिस्टीम
PVC Pipes उत्तर-पूर्वेकडे सरकण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हवामान विभाग या प्रणालीवर बारकाईने लक्ष ठेवून असून येत्या काही दिवसांत त्याबाबत अधिक स्पष्टता येईल.













